<p style="text-align: justify; "><span>तमिळनाडू राज्यातील एक जात. त्यांच्यात रूढ असलेल्या एका लोककथेनुसार अहल्येला इंद्रापासून जे तीन मुलगे झाले, त्यांपासून मरवन, कल्लन व आगमुदैयन या तीन जातींची उत्पत्ती झाली. आगमुदैयनांपैकीज्या लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे झाले, त्यांची गणना वेळ्ळाळ जातीत होऊ लागली. आगभुदैयन लोक मुख्यत: शेती करतात. आयनार, पिडारी व करुपण्णस्वामी यांसारख्या ग्रामदेवतांची पूजा करतात. लग्न लावण्यासाठी ते ब्राह्मण उपाध्याय </span></p> <p style="text-align: justify; "><span>लेखिका : दुर्गा भागवत</span></p> <p style="text-align: justify; ">माहिती स्रोत : <a class="external-link" href="https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand1/index.php/component/content/article?id=4403" target="_blank" title="आगमुदैयन">मराठी विश्वकोश</a></p>